लवकरात लवकर नुकसानभरपाई द्या युवा संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वैरागडे यांची मागणी
गडचिरोली वार्ता न्यूज
चामोर्शी तालुक्यात सततच्या अतिवृष्टीमुळे पुर परस्तीती निर्माण झाली होती .चामोर्शी तालुक्यात हजारो हेक्टरवर शेतजमिनी पाण्याखाली येवून शेताला तलावाचे रूप आले होते.यामुळे शेतातील उभे पीक खरडून गेल्याने पिकाची अतोनात नुकसान झाली. शेतकऱ्यांवर चक्क तिबार पेरणीची वेळ आली असतांना सुद्धा नुकसानभरपाईची कुठलीच मदत प्रशासनाकडून मिळाली नसल्याने शेतकरी बांधव मोठया आर्थिक अडचणीत सापडल्याचे भयाण वास्तव निर्माण झाले आहे.अतिवृष्टी जाहीर झाले आहे. अतिवृष्टी जाहीर करुन ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नसल्याने तत्काळ मदतीच्या मागणीसाठी युवा संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वैरागडे यांनी युवा संकल्प संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात येणार असून धरणे आंदोलनाचा ईशाराही यावेळी देण्यात आला आहे.
Post a Comment