त्या' नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी किशोर उसेंडी गडचिरोली वार्ता न्यूज

'त्या' नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

किशोर उसेंडी
गडचिरोली वार्ता न्यूज 


 देसाईगंज : नरभक्षक वाघाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. या वाघाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी रयत शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

आरमोरी अरसोडासह विविध ठिकाणी १० बळी घेतल्यानंतर मानवी रक्ताची चटक लागलेल्या नरभक्षक वाघाने ११ वा बळी सालमारा येथील शेतकऱ्याचा घेतला. देसाईगंज तालुक्यातील उसेगाव येथीलही नागरिकाचा बळी घेतला आहे. या वाघाचा बंदोबस्त न केल्यास आणखी जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम, किसान सभेचे अमोल मारकवार, निखिल धार्मिक, शेषराव कुमरे, प्रितम ढोडणे यांनी केली. दरम्यान, उसे गावातील प्रधान कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले...

0/Post a Comment/Comments