*रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत लोखनिज वाहतूक बंद करा*

*रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत लोखनिज वाहतूक बंद करा*

*अन्यथा आंदोलन करू; मुलचेरा तालुका काँग्रेसचा इशारा*

मुलचेरा: एटापल्ली तालुक्यातील लोह खनिज प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रस्त्यांचची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. आष्टी अल्लापल्ली सीरोंचा महामार्ग पूर्णतः नेस्तनाभूत झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सुरजागड लोखनीज वाहतुकीचा मुख्य मार्ग अल्लापल्ली - आस्ठी आहे. मात्र हे महामार्ग खराब झाल्याने त्या रस्त्यावर चालणारी सुरजागड लोह खनिजाची वाहतूक अल्लापल्ली- मुलचेरा मार्गे आष्टी कडे होते. सदर भागातील रस्ते हे अरुंद व चिरिव असल्याने याही भागात अपघाताचे प्रमाण वाढत चाललेले आहे त्यामुळे आष्टी आलापल्ली महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सुरजागड लोहखानीची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात यावे, अन्यथा मूलचेरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुलचेरा तालुका काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेला आहे. 
यासंदर्भात तालुकाध्यक्ष प्रमोद गोटेवार, उपाध्यक्ष अनुप नांदी, काँग्रेस कार्यकर्ते खुशाल येलमुले, किसन कोत्तावा, र सुशांत हलदर, जितेंद्र तनमलवार, आनंदराव यांनी तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणयात आले आहे.

0/Post a Comment/Comments