येरमनार ( टोला ) येथील मडावी परिवाराला माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम ( हलगेकर ) यांच्या कडून आर्थिक मदत



व्यंकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी

अहेरी तालुक्यातील येरमनार ( टोला ) येथील डोलु पेंटा मडावी यांच्या घराला शनिवार दुपारी अचानक आग लागले त्या आगीत संपुर्ण घरच जाळुन खाक झालेला आहे. त्यामध्ये डोलु मडावी यांचे - मोठे ३ ढोली धान, पैसे, ५०० ग्राम सोना, भांडी, कपडे, कुटुंबातील व्यक्तींचे सर्व महत्त्वाचे कागदपत्रे सह घरात असलेले सर्वच सामान जळून खाक झालेला आहे. आता सदर कुटुंबातील नागरिकांकडे अंगावर लावलेले कपडेचा व्यतिरिक्त इतर दुसरा कोणत्याच सामान त्यांचा कडे नाही. 
         सदर घटनेची माहिती माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य सौ. भाग्यश्री ताई आत्राम ( हलगेकर ) यांना माहिती मिळताच तलाठी ला फोन करून, सदर घटनेची तत्काळ पंचनामा करण्यास सांगितले व प्रत्येक्षात घटनास्थळी भेट देऊन, कुटुंबीयांशी झालेली घटनेबद्दल चर्चा करून, मडावी कुटुंबाला आर्थिक मदत ही करण्यात आले आहे. 
         तसेच शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी पाटपुरवठा करणार असल्याचं सांगत मडावी कुटुंबीयाला दिर देण्यात आला.
       यावेळी येरमनार चे माजी सरपंच - बालाजी गावडे, कमलापुर चे माजी सरपंच - संबय्या करपेत, येरमणार चे पाटील - डोलु मडावी, तलाठी - फिरोज मडावी, कोतवाल - प्रवीण दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते - बाबुराव तोरेम, तिरुपती मडावी, येरमनार चे माजी उपसरपंच - पोच्या तलंडी, सुरेश आत्राम, चुंडू तलांडी, अडवे आत्राम, राजु मडावी, संदीप गावडे, बाबुराव तलांडी सह येरमनार गावातील नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments