एकाच कुटुंबावर काळाचा घात, अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू, दोन गंभीर जखमी





राजुरा : वेगवान ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राजुरा शहरालगत थोपटाळा पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, त्याच ट्रकने आणखी एका दुचाकीला धडक दिल्याने दोघे जखमी झाले आहेत. नीलेश वैद्य (३२), रूपाली वैद्य (२६), मधू वैद्य (3, रा. धोपटाळा) असे पहिल्या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर दुसऱ्या अपघातात प्रज्ञा प्रसाद टगराफ (३३), प्रसाद राजाबाई टगराफ (४०, दोघेही रा. रामपूर) झाले. अपघाताची माहिती नागरिकांनी एकच गर्दी केली होती. नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

थोपटाळाच्या गुरुदेवनगरातील नीलेश वैद्य सकाळी पत्नी व मुलीसह बाहेरगावी गेले होते. सायंकाळी ते घरी परतत असताना घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील पेट्रोल पंपाजवळ राज्याकडून सास्तीकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. दुचाकीचा चुराडा होऊन तिघांचाही जागीच मृत्यू झाला. जखमींना चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

0/Post a Comment/Comments