शेतकऱ्यांच्या हक्कासाठी BRS पार्टी मैदानात



आज शेतकऱ्यांच्या प्रश्नी BRS पार्टीचा धडक मोर्चा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.औरंगाबाद विभागाचे माजी विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रकर यांनी शेतकऱ्यांना एक्करी दहा हजार रु अनुदान देण्याची सरकारकडे केलेली शिफारस तात्काळ लागू करावी आणि महाराष्ट्रात तेलंगणा मॉडेल लागू करावे या प्रमुख मागण्यांसह ईतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चाचे आयोजन BRS पार्टी किसान सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांनी केले होते.यावेळी परभणी शहरात सगळीकडे गुलाबी वादळ पसरल्याची जोरदार चर्चा सूरु झाली आहे.शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात BRS पार्टीचेच सरकार यायला हवे अशी देखील भावना मोठया प्रमाणात शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना दिसत आहे.

0/Post a Comment/Comments