*प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा



माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांचा पुढाकार !!

अहेरी:- तालुक्यातील विविध गावातील नागरिकांच्या प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी अहेरी चे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.

मागील अनेक वर्षांपासून विविध कारणाने या भागातील नागरिकांचे वनहक्क दावे निकाली काढण्यात आले नाही.त्यामुळे नागरिकांना अनेकदा विविध कार्यालयात चकरा मारावे लागत आहे.या बाबीची दखल घेऊन भाग्यश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.यावेळी भाग्यश्री ताई आत्राम यांनी वनहक्क दाव्या बाबत येणाऱ्या अडचणी आणि नागरिकांची समस्या अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडले.यावर सकारात्मक चर्चा झाली असून वनहक्क दावे बाबत तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.

यावेळी पेरमिली,कमलापूर,देवलमरी, आरेंदा, येरमनार,रेपनपल्ली, आवलमरी,राजाराम,मेडपल्ली आदी ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गावातील नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments