माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन



चिंचगुंडीवासीयांची मागणी झाली पूर्ण

अहेरी:- तालुक्यातील चिंचगुंडी येथे माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

चिंचगुंडी येथील नागरिकांना गावातील विविध सभा आयोजित करताना झाडाखाली किंव्हा इतरत्र बसून सभा घ्यावा लागत होता.गावात सभा मंडप झाल्यास ही समस्या दूर होणार म्हणून गावकऱ्यांनी भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे मागणी केली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन भाग्यश्री ताई आत्राम यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना त्वरित सभा मंडप बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.अखेर आमदार निधीतून मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी ७ लाख ३८ हजार रुपये मंजूर केले आहे.

निधी प्राप्त होताच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी चिंचगुंडी येथील सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन केले.आता चिंचगुंडी वासीयांची अडचण दूर झाली असून गावातील नागरिकांनी ताईंचे आभार मानले आहे.या भूमिपूजन कार्यक्रमाला सरपंच कमला बापू आत्राम,तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, मखमुर शेख, रामू कस्तुरवार, बिच्चु मंचालावार, बापू गानालावार, शंकर बाकोलू, रामन्ना कस्तुरवार, तिरुपती पालेवार,राजू आत्राम, राजाराम कुमरे, राकेश गानालावार, विनोद देवरवार, गागुबाई कंपेलवार, हरीश येमुलवार आदी गावकरी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments