गोमनी ग्रामपंचायत अंतर्गत गावांचा होणार कायापालट


गोमनी ग्रामपंचायत अंतर्गत गावांचा होणार कायापालट

भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन

मुलचेरा:तालुक्यातील गोमनी ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट विविध गावांत विकासात्मक कामे होणार असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

गोमनी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गावांचा विकास करण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी निधी दिली असून मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जाणार आहेत.नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम मुलचेरा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना येथील विविध गावांत जाऊन सिमेंट रस्ते,नाली बांधकाम,अंगणवाडी केंद्र बांधकामाचे भूमिपूजन केले.त्यामुळे गावातील नागरिकांनी ताईंचे आभार मानले.

विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंग येथील उपसरपंच साईनाथ चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष युधिष्ठिर बिश्वास,सुंदरनगरचे सरपंच जया मंडल, विवेकानंदपूर चे सरपंच भावना मिस्त्री,गोमनी ग्रामपंचायत चे सदस्य शुभम शेंडे,अजय विरमलवार,सुंदरनगर ग्रामपंचायत सदस्य रंजित स्वर्णकार, निखिल इज्जतदार,बबलू शील,विष्णू रॉय आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments