जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर -राजे अम्ब्रिशराव आत्राम


जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर -राजे अम्ब्रिशराव आत्राम


बोलेपल्ली येथे भव्य कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न


मूलचेरा:-तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या बोलेपल्ली येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक म्हणून अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते.जनतेला मार्गदर्शन करतांना ते म्हणाले बोलेपल्ली क्षेत्रातील सभोवताली असलेल्या 11 गावाचा सर्वांगीण विकासाचा संकल्प केला आहे.तसेच सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर असतो.तुमच्या गावातील,परिसरातील प्रत्येक अडी-अडचणी दूर होईल असे आश्वासन मी आज तुम्हाला देत आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून कोष समिती अध्यक्ष रमेश तिम्मा,ग्रा.सद्स्य सीताराम पल्लो,माजी पोलीस पाटील मनोहर तिम्मा,गाव भूमिया मत्सरी झोरे,सामाजिक कार्यकर्ते फकिरा दुर्वा,भाजपा तालुका अध्यक्ष संजीव सरकार,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता,महामंत्री सुभाष गणपती,बंगाली आघाडी अध्यक्ष मोंटु सरकार,उपाध्यक्ष स्वरूप पोद्दार हे होते.
यावेळी स्थानिक माता मंदिर भूमिपूजन करण्यात आले.स्थानिक गावकऱ्यांनी ढोल,ताशांच्या गजरात व भलामोठा पुष्पहार देऊन राजे साहेबांचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष दिलीप आत्राम,भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे,ओबीसी आघाडी अध्यक्ष गणेश बँकावार,बाजीराव मडावी,हेमराज झोरे,विजय शेट्टीवार तसेच भाजपचे कार्यकर्ते,स्थानीक गावकरी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments