राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली तालुक्यात ठरताहे देवदूत


राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली तालुक्यात ठरताहे देवदूत

 तब्बल 5 अपघातग्रसतांना‌ केली मदत

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 

एटापल्ली: तालुक्यातील राजमुद्रा फाउंडेशनने ग्रामीण भागातील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात आहे. आणि आजपर्यंत या राजमुद्रा फाउंडेशनच्या मदतीने अनेकांचे जीव वाचले आहे. या राजमुद्रा फाउंडेशनचे तालुक्यात कौतुक केले जात असून ग्रामीण भागात देवदूत ठरत आहे. आज दि. 3 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता संकेत पुल्लूरवार यांनी राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली चे सचिव मनीष ढाली यांना फोन करून एटापल्ली ते कसनसूर मार्गांवर तोडसा नाल्या जवळ अपघात झाल्याचे सांगितले लगेच कश्याचाही विचार न करता मनीष ढाली व राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली चे अध्यक्ष अनिकेत मामीडवार लगेच त्यांची रुग्णवाहीका घेऊन अपघात स्थळी पोहचले दोन दुचाकी वाहन समोरासमोरून धडक दिली असल्याने एकूण 5 व्यक्ती जखमी झाले त्यामध्ये लक्ष्मण कवडो रा. मोहुर्ली , नागेश पुंगाटी रा. कुद्री , संतोष आलामी व रेखा आलामी रा. नागूलवाडी , अनिल तलांडे रा. पंदेवाही ता. एटापल्ली येथील रहिवासी आहेत सगळ्यांची स्थिती ठीक असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सदर रुग्णांना मदत करते वेळी आदित्य चिप्पावार , प्रसंजित करमरकर व आदी नागरिक उपस्थित होते. ग्रामीण भागात कार्य करणारी ही फॉउंडेशन ग्रामीण भागातील रुग्णांन करिता देवदूत ठरत आहे.

0/Post a Comment/Comments