*सर्पदंशाने युवकाचा मृत्यू* *सती नदीवर पूल असता तर कदाचित वाचला असता जीव*


*सर्पदंशाने युवकाचा मृत्यू* *सती नदीवर पूल असता तर कदाचित वाचला असता जीव*

- पर्यायी मार्गाचा गंभीर रुग्णांनाही फटका

🖋ताहिर शेख🔸
ता. प्र / कुरखेडा दि. ०९/०७/२०२४ तालुक्यातील सावरगांव (येगंलखेडा) येथे शेतात काम करतांना सर्पदंश झाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. करण संजय उईके (वय २२) रा.बोरटोला भरनोलि ता. अर्जुनी मोर जि.गोंदिया असे मृतक युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, करण हा कुरखेडा तालुक्यातील सावरगाव (येंगलखेडा) येथे शेती कामानिमित्त आला होता. दरम्यान सोमवार ८ जुलै रोजी शेतात काम करतांना त्याला सर्पदंश झाला. त्याला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत त्याला मृत्युने कवटाळले होते. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करत काही क्षणांपूर्वी पोहचले असते तर रुग्ण दगावला नसता असे सांगितले. युवा शेतकऱ्याचा अशा मृत्युने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नदीवर पूल असता तर वाचला असता जीव

करन ल सर्पदंश झाल्याने रुग्णवाहिका बोलावण्यात आली मात्र पुलाभावी ते पोहचण्यास अधिक विलंब लागणार असे सांगतात आल्याचे कळते. त्यामुळे सहकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता खासगी वाहनाने कुरखेडा येथे हलविले मात्र पर्यायी मार्गाचा अधिकचा अंतर आणि लागणारा वेळ यामुळे रुग्णालयात पोहचण्यास विलंब झाला आणि करन चां मृत्यू झाला, नदीवर पूल असता तर जीव वाचला असता असे बोलण्यात येत आहे.
कुरखेडा येथील सती नदीवरील जुना पूल पडून नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान शेजारीच नदीतून रपटा तयार करण्यात आला होता मात्र नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने ४ जुलै रोजी वाहून गेला. त्यामुळे आता कुरखेडा तालुका मुख्यालय गाठण्यासाठी आंधळी - वाघेडा - मालदुगी - गोठणगाव फाटा असा पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र हे अंतर आता अधिक असल्याने या मार्गाने तालुका गाठण्यासाठी अधिकचा वेळ लागत असल्याने याचा फटका गंभीर रुग्णांना बसत आहे. वेळेवर रुग्ण रुग्णालयात दाखल होऊ शकत नाही अशी ओरड नागरिकांची आहे

0/Post a Comment/Comments