सर्व विभाग प्रमुख, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे.

सर्व विभाग प्रमुख, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे.


खासदार डॉ किरसान यांचे आढावा सभेतून निर्देश,



एटापल्ली;(गडचिरोली)
येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित आढावा सभा प्रसंगी प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विकास कामे करतांना नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन सौजन्याने वागावे असे निर्देश देण्यात आले आहे.

यावेळी आढावा घेतांना तालुक्यातील रखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती व नूतनिकरणाच्या कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम अभियंता सुनील बावणे यांना देण्यात आले आहेत. आरोग्याच्या समस्या संबधी तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन कन्नके,वैद्यकीय अधीक्षक डॉ तुपेश उईके यांना आरोग्य सेवा सक्षम करून सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा प्रधान करण्याचे सांगितले, महसूल, विज वितरण, कृषी, वन, भूमिअभिलेख, पंचायत समिती, बाल विकास प्रकल्प व शिक्षण विभाग अशा तालुका स्तरावरील विविध विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपण लोकसेवक या भावनेने गोरगरीब, आदिवासी व अविकसित भागाच्या नागरिकांची सेवा करण्याच्या संधीचे सोने करण्याचे आवाहन खासदार डॉ नामदेव किरसान यांनी सांगितले आहे.

यावेळी, उपविभागीय अधिकारी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार, पेंटा रामा तलांडी, आदिवासी काँग्रेस आघाडी जिल्हा अध्यक्ष हनुमंतु मडावी, तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश गंपावार, नगरसेवक निजान पेंदाम, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा नगरसेविका ताराताई गावडे, नगरसेवक मनोहर बोरकर, प्रज्वल नागुलवार, भाकप सचिव कॉ सचिन मोतकुरवार, शिवसेना तालुका प्रमुख अक्षय पुंगाटी, सतीश मुप्पलवार, लोकनाथ गावडे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments